रणछोडदास
रणछोडदास / जरासंध आणि
कालयवन -
एक संघर्ष निमाला असे म्हणेपर्यंत
दुसरा दुसरा संघर्षाचा
मुद्दा
जमिनीतून
डोके वर काढून उभा होता.
कंसवधानंतर
नंदनंदन
वासुदेवाच्या
मुत्सद्दीपणाला
एक अलौकिक
धार चढत गेली.
कृष्णनीती
आणि कृष्णरणनीती
जास्त जास्तच
चाणाक्ष,
निपुण,
तीक्ष्ण,
कूट आणि प्रतिभासम्पन्न
होत गेली.
प्रसंग पाहून प्रत्येक
शत्रूसाठी
त्याने
वापरलेली
कूटनीती
दरवेळेस
संपूर्ण
वेगळी पण नेमकी,
उचित अशीच होती.
शत्रूंना
आकलनही
होणार नाही अशा ह्या साक्षात
भगवान कालमूर्तीने
खुबीने
रचलेल्या
जाळ्यात
दरवेळेस
शत्रू अलगद अडकत गेला.
ह्या गोविंदाला बांके म्हणून
संबोधलं
जातं ते तेवढ्यासाठीच.
बांकेचा
अर्थच हटके काहीतरी
वेगळा,
अलौकिक!
सरळ वागणारा
नाही हा गोकुलेश.
थोडासा
वाकडाच.
उभा राहिला
तरी बासरी वाजविण्यासाठी
मान वेळावून,
कमरेत किंचित
लवून कदंबाच्या
झाडाला
कंबर टेकून,
एका पायावर
दुसरा पाय ठेऊन उभी त्याची
त्रिभंगाकृती
(तीन
ठिकाणी
बाक असलेली)
मूर्ती
सरळ मनाच्या
भक्ताच्या
हृदयात
अशी काही अडकून बसते की त्या श्रीहरीला
स्वतःला
देखील भक्तहृदयातून
सोडवून
घेणं आणि हृदयातून
निघणं शक्य होत नाही,
तर शत्रूला
हा त्रिभंगाकृती
रमारमण
पचविण्यास
किती अवघड असावा?
जणु कंठात हाड अडकल्याप्रमाणे
अडकून प्राण कंठाशी
यावेत.
कृष्णाची गाथा अभ्यासतांना
दिसेल की, कृष्णाच्या
प्रत्येक
रणसंग्रामामागची
कारण मिमांसा
वेगळी आहे,
पार्श्वभूमी
वेगळी आहे.
दरवेळचा
प्रतिस्पर्धीही
वेगळा आहे.
उद्दीष्टेही
वेगवेगळी
आहेत.
आणि त्यानुसार
ते संग्राम
अथवा लढे हाताळण्याची
कृष्णनीतीही
दरवेळेला
वेगवेगळी
आहे.
तरीही धर्माच्या अचल स्थाणुवर भक्कमपणे उभी आहे. सत्याच्या
आणि विवेकाच्या
कठीण अशा गंडकी शिळेवर
अस्सल सुवर्ण
घासल्यावर
सुवर्णाची
चमकदार
सुवर्णरेखा
जशी चमकून जावी तशी दरवेळची
लखलखित
कृष्णनीती
सर्वांना
थक्क करत गेली आहे
.
कंसाच्या वधाने कृष्णामागे
लागलेल्या
समस्या
संपणार
नव्हत्या.
उलट निमंत्रण
मिळालेला
आंधळा जसा हात धरून अजून एका डोळसाला
सोबत घेऊन येतो,
शिशु शाळेतील
कार्यक्रमाला
बोलावल्यावर
लहान मूल आईबापाचा
हात धरून येते किंवा साखळीमधील
एक कडी ओढली की एकात एक अडकवलेल्या
सगळ्याच
कड्या खेचल्या
जातात त्याप्रमाणे
मथुरेत
झालेला
कंसाचा
वध जरासंधाची
अजून एक आपत्ती
घेऊन आला.
मगधासारख्या
अति बलाढ्य
साम्राज्याचा
राजा जरासंध
मथुरेच्या
कंसाचा
सासरा होता.
जरासंधाच्या
दोन मुली अस्ति आणि प्राप्ती कंसाला दिलेल्या होत्या. कंसाच्या मृत्यूनंतर मथुरेचं राज्य परत उग्रसेनाकडे जावं वा तेथे उग्रसेनाच्या अधिपत्याखाली परत प्रजातंत्र राज्य उदयाला यावं हे जरासंधाच्या दृष्टीने हितकारक नव्हतं. कंसवधाने बिथरलेल्या,
सूडाने
पेटून उठलेल्या,
प्रचंड
रागवलेल्या
जरासंधाने
मथुरेवर
स्वारी
केली.
त्या युद्धात
कृष्णाने
त्याला
बंदीवान
केले.
बलराम जरासंधाला
ठार मारायच्या मताचा होता. त्याने
जरासंधाचा
वध करायचं
ठरवलं.
परंतु जरासंध मगधाचा
राजा होता.
प्रचंड
मोठा भूभाग जरासंधाच्या
अधिपत्याखाली
येत होता.
जरासंधाला
मारणं सोपं असलं तरी एवढ्या
मोठ्या
भूभागाची
व्यवस्था
त्वरीत
लावणं सोप नव्हतं. जरासंधाच्या मृत्यूने तिथे अराजक माजलं असतं.
ते जनहिताचं
नक्कीच
नव्हतं. आत्ताच्या काळात पाहिलं तर तेव्हाच्या परिस्थितीचं आकलन सोपं जाईल. नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानच्या युद्धात तालिबान्यांकडून काबूलचा पाडाव होत आहे, राष्ट्रपती अश्रफ घनी पळून जात आहे हे पाहिल्यावरच तेथील गुंड आणि पोलीसांनीच तेथील दुकानं, घरं लुटायला सुरवात केली. उरलेली तालिबान्यांनी लुटली. लहान मुले, मुली, स्त्रियांवर होणार्या अत्याचारांनी, त्यांच्या आक्रोशानी आसमंत व्यापून गेला. देशातून निर्वासितांचे लोंढे शेजारच्या देशांमधे आश्रयासाठी धावू लागले. देशात अराजक माजलं. आकाशात उडणारया कपोतावर बहिरी ससाण्यानी झेप घ्यावी वा शिकारी कुत्र्यांच्या टोळीने, जाळीत शिंग अडकलेल्या, एकट्या हरणावर तुटून पडावं त्याप्रमाणे राजाचा पराभव होत आहे, राजा पळून जात आहे, शत्रू राज्य बळकावत आहे हे पाहताच जिचा कोणी त्राता राहिला नाही, जिचं संरक्षण करणारं कोणी तिच्यापुढे
ढालीप्रमाणे उभे नाही हे पाहून न्याय, नीतीची चाड नसलेले शत्रूपक्षाचे
त्याचप्रमाणे त्याच राज्यातील लोभी, लुच्चे, दुर्जन चहूबाजूने प्रजेचे , राज्याचे, सम्पत्तीचे
लचके तोडण्यासाठी तुटून पडतात. राज्यावर चहूबाजूनी संकटं कोसळायला लागतात आणि त्यात निरपराध जनता भरडून निघते. पुरी नागवली जाते. कंगाल होते. देशोधडीला लागते. ती समस्या त्या राज्यापुरती मर्यादित राहात नाही तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या राज्यांनाही भोगावा लागतो. आत्ताशी मथुरेच्या राज्याची घडी नीट बसत असतांनाच अजून मगधाकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा काही काळ जरासंधाला मोकळं ठेवणं श्रेयस्कर होतं.
शिवाय जरासंध
एकटाच कृष्णाच्या विरोधात होता असे नाही तर दुष्ट हेतूने स्वार्थासाठी एकत्र येणारे
इतरही अनेक राजे उघड वा गुप्तपणे कृष्णाच्या विरोधात जरासंधाच्या बाजूने होतेच. हे
कोण आहेत हे कळण्यासाठी आणि त्या एकेकाचा छडा लावून त्याचा निःपात करण्यासाठी जरासंधाला
मोकळे ठेवणे आवश्यक होते.
ही दूरदृष्टी बलरामात नसली तरी कृष्णात
होती.
कृष्णाच्या
मध्यस्थीमुळे जरासंध बचावला.
एका गवळ्याच्या
शेंबड्या
पोराकडून
प्राणांचे
दान मिळाल्याने
जरासंधाचा
अहंकार
दुखावला
गेला.
जरासंध
जखमेवर
मीठ चोळल्याप्रमाणे
तगमगत तडफडत होता.
संधी मिळताच
कृष्णावर
चढाई करून मथुरा ताब्यात
घेण्याची
महत्त्वाकांक्षा
दिवसेंदिवस
तीव्रच
होत होती.
कंसाच्या मृत्यूनंतर उग्रसेनाला
लोकांनी
त्यांचा
लोकप्रतिनिधी
मानले होते.
कृष्णानी
उग्रसेनाला
मी तुमचा सेवक म्हणून
राहीन असं आश्वासनही
दिलं होतं.
मथुरेची
घडी परत नीट बसेपर्यंत
उग्रसेनाला
मदत करणे आवश्यकही
होते.
मथुरेच्या
रक्षणासाठी
कृष्ण सज्ज होता.
सतरा वेळेला
जरासंध
मथुरेवर
चालून आला आणि सतरा वेळेला
कृष्णाने
केलेल्या
कडव्या
प्रतिकारामुळे
जरासंधाला
माघार घेणे भाग पडले.
सतरा वेळेला झालेल्या
पराभवाने
जरासंधाला
हे लक्षात
आले की मथुरा जिंकायची
हे काही एकट्याच्या
बळावर साध्य होण्यासारखे
नाही.
आठराव्या
वेळेला
त्याने
परकीय सत्तेचा
हात धरून मोहिम आखली.
शल्य राजाने
कृष्णाशी
लढण्यासाठी
कालयवनाची
सहाय्यता
घेण्याचे
सुचविले
आणि त्याला
ते लगेचच पटलेही.
त्याचे
कारणही
तसेच होते.
त्यावेळेस भारतवर्षात वेदनियमांनी
सांगितलेल्या
सनातन धर्माचे
पालन होत असे.
हे नीतीनियम
ज्यांना
मान्य नव्हते
वा खरेतर ज्यांना
कुठलेच
नीती नियम पाळायचे
नव्हते,
उन्मुक्त
आयुष्य
जगणे हेच खरे जीवन आहे अशा सर्व अनीतीचा
मार्ग स्वीकारलेल्यांना अफगाणिस्तानच्या पलिकडे
असलेल्या हिंदुकुश पर्वताच्या
पलिकडे
घालवून
दिले होते.
त्यांना
यवन किंवा म्लेंच्छ
असे संबोधले
जात असे.
तेथील मलिच देशावर
कालजंग
नावाचा
अत्यंत
क्रूर राजा राज्य करत होता.
त्याला
संतान नव्हते
तेंव्हा
आनंदगिरी
येथील एका मुनींने
त्याला
शेशिरायणकडून
त्याचा
मुलगा मागून घेण्यास
सांगितले.
हाच मुलगा पुढे कालयवन
म्हणून
प्रसिद्ध
झाला.
त्रिगत राज्याचे कुलगुरू
शेशिरायण
हे मूळचे ब्राह्मण.
श्री शिवाच्या
कृपेने
रंभेपासून
त्यांना
मुलगा झाला.
कोणत्याही
अस्त्र,
शस्त्राने
हा मुलगा मरणार नाही अथवा सूर्यवंशी
वा चांद्रवंशी
योध्यांकडूनही
तो पराजित
होणार नाही असा त्याला
वर होता.
सूर्यवंशी
आणि सोमवंशी
राजे हे अत्यंत
नियमाने
वागणारे
होते.
दिलेला
शब्द पाळणारे
होते.
सर्व नियम धाब्यावर
बसविणार्या
आणि फसवणुकीच्या
पायावरच
उभ्या असलेल्या
कालयवनाचे
पारडे त्यामुळेच
जड होते.
रंभेने मुलगा जन्माला
येताच त्याला
त्याच्या
बापाच्या
हवाली करून स्वर्गाचा
रस्ता धरला.
असा हा कालयवन
कालजंगाच्या
कृपेने
मलिच देशाचा
अत्यंत
क्रूर पण प्रतापी
राजा झाला.
एकदा त्याने
नारदांना
विचारले,
``ह्या
पृथ्वीवर
माझ्या
तोडीस तोड माझ्याशी
युद्ध करू शकेल असा कोण वीर आहे?''
तेंव्हा
नारदांनी
श्रीकृष्णाचे
नाव सुचवले.
शल्य आणि नारद यांच्यामुळे
कालयवन
आणि जरासंधात
मैत्रीची
वीण विणली गेली नसती तरच आश्चर्य.
दोघांचं
उद्दिष्ट
एकच होतं कंसान्तक
श्रीकृष्ण!
जरासंध आणि कालयवनात
झालेल्या
संधीनुसार
एका बाजूने कालयवनाने तर दुसर्या
बाजूने
जरासंधाने
मथुरेवर
हल्ला चढविण्याची
तयारी केली.
कालयवनाने
मथुरेला
वेढा दिला आणि श्रीकृष्णाला
युद्धासाठी
ललकारले.
युद्ध मथुरेत झाले असते तर मोठ्याप्रमाणात
मथुरेचे
सैन्य कामी आले असते.
शिवाय राज्याची
नासधूस
आणि अपरिमित
हानी झाली असती.
एका बाजूने
कालयवनाचा
वेढा तर दुसर्याबाजूने
बलाढ्य
जरासंध
ह्यांच्या
कात्रीत
सापडणे
परवडणारे
नव्हते.
त्यात घात निश्चित
होता.
युद्धात आपल्या बाजूचे
होणारे
नुकसान
आणि होणारी
प्राणहानी
लक्षात
घेऊन शत्रू कितीही
निंदनीय,
अनार्य,
अविश्वसनीय
असला तरी त्याच्याबरोबर
संधी/
तह करणे काही वेळेला
उचित आणि अपरिहार्य
असते.
शत्रू जर स्वभावतःच
दुष्ट,
क्रूर,
लोभी,
नीती नियम न जुमानणारा,
नेहमी असत्याचा
आश्रय घेणारा
असेल तर तो तहाचे नियम कधीही मोडू शकतो किंबहुना
मोडतोच
हेही स्मरणात
ठेऊन,
अशा शत्रूशी
प्रत्यक्ष
तह करून उपयोग नसला तरी आपण त्याच्याशी
तह करत आहोत असे त्याला
वाटायला
लावणे तरी जरुरीचे
असते.
बुद्धिमान
व्यक्ती
अशावेळी
कूर्म-वृत्तिचा
अवलंब करतात.
कासव ज्याप्रमाणे
त्याचे
सर्व अवयव कवचात ओढून घेऊन त्याच्यावर
होणार्या
प्रहाराला
हूं की चूं न करता तोंड देते त्याप्रमाणे
आपल्या
सर्व राज्याला
सुरक्षित
करून बलाढ्य
शत्रूचा
आघात धैर्यपूर्वक
सहन करत,
माघार घेतल्याचे
दाखवून,
वेळ येताच भुजंगवृत्तीचा
अवलंब करून शत्रूवर
आक्रमण
करणेच उचित असते.
संकटी कवचामध्ये । अंग सारेची ओढुनी
जैसे कासव सोसे ते । प्रहार कवचावरी ।।
तैसे सुरक्षित राज्यासी । करावे चहुबाजुनी
बलाढ्य शत्रूचा मारा । सोसावा धैर्य दावुनी ।।
काळ उचित येताची । शत्रूवर कडाडुनी
तुटून पडणे ऐसे । डसे जैसा भुजंगची
{ कौर्मं
सङ्कोचमास्थाय
प्रहारानपि
मर्षयेत्
।
प्राप्ते काले च मतिमानुतिष्ठेत्कृष्णसर्पवत् ।। 20 काकोलूकियम् }
शत्रूने उत्पन्न केलेल्या
अनिवार्य
युद्धस्थितीच्या
संकटाकडे
दुर्लक्षून
वा टाळून तर चालत नाही.
त्याला
सामोपचाराने
मिटविण्याचा
प्रयत्न
करावा लागतो.
युद्धात
कोणी माझाच विजय होणार असे निश्चित
सांगू शकत नाही.
त्यामुळे
युद्ध करायची
खुमखुमीही
थोडी बाजूला
ठेउन,
बोलणी करून जर युद्धस्थिती
निवारण
करण्यात
यश मिळत असेल तर ताबडतोब
युदधाचा
विचार थोडासा
बाजूला
ठेवणेच
इष्ट.
संग्रामी विजयश्रीची । नसे खात्री कुणासही
बोलणीच बरी आधी । नको युद्धा उतावळी
आग्रहं विग्रहं मत्वा सुसाम्ना प्रशमं नयेत् ।
विजयस्यह्यनित्यत्वाद्रभसं च समुत्सृजेत् ।।21 काकोलूकियम्
कृष्णाजवळ कालयवनाची कुंडलीच
तयार होती.
कृष्ण कालयवनाला
स्वतःहून
भेटला.
अगदी निःशस्त्र
भेटला.
त्याला
म्हणाला,
``दोन्ही
बाजूच्या
सैन्याचा
विनाश होण्यापेक्षा
आपण दोघेच युद्ध करू या. त्यात जो जिंकेल
तो जिंकेल.''
स्वतःला
मिळालेल्या
शिवाच्या
वरांमुळे
सोमवंशी
यदुनाथाबरोबर
लढायला
कालयवन
लगेचच तयार झाला.
फाजिल आत्मविश्वास
माणसाला
नडतो तो असा.
शत्रूला
कमजोर,
दुबळा समजण्याची
चूक शहाण्याने
करू नये.
शत्रूचा
तो डावही असू शकतो.
कालयवनाशी युद्ध करता करता कृष्ण त्याला
हुलकावण्या
देत भलतीकडेच
घेऊन जात होता.
कृष्णाच्या
मागे जाता जाता कालयवन
कृष्णाच्या
भ्याडपणाला
नावे ठेवित त्याला
समोरासमोर
युद्धाला
ललकारत
होता,
``अरे
तू स्वतःला
पराक्रमी
सोमवंशाचा,
यदु कुळातील
म्हणवतोस
आणि असा भ्याडासारखा
मला चकवतोयस
काय?''
कालयवनाने
कितीही
डिवचले
तरी त्याला
बळी न पडता शांत चित्ताने
ठरविलेल्या
योजनेनुसार
कृष्ण कालयवनाला
झुलवत राहिला. भुलवत, झुलवत एका विवक्षित स्थळापर्यंत नेत राहिला. ते पलायन नव्हते तर शत्रुला
भुलवणारी युद्धनीतीतील ``यान’’ ह्या नावाची रणनीती होती.
कालयवनाच्या
कचाट्यात
न सापडणारा
हा यदुनाथ
पळपुटा
भ्याड असता तर कालयवनाला
निःशस्त्र
एकटा भेटायला
आलाच नसता हे काही कालयवनाला
उमगले नाही.
एडका टक्कर देतांना
मागे हटला तरी तो पळून जाण्यासाठी
मागे सरकत नाही.
परत एकदा नव्या दमाने तो शत्रूवर
चढाई करतो.
सिंह शत्रूवर
चढाई करण्यापूर्वी
दबा धरून बसतांना
सर्व अंग संकुचित
करून घेतो.
त्याप्रमाणे
वैराचं
भानं ठेऊन आपलं मनोगत निश्चित
करत,
आक्रमणाच्या
संधीची
वाट बघत बलवान राजा सुद्धा
पलायनाचा
अवलंब करतो. आणि योग्य वेळ साधून शत्रूचा
नायनाट
करतो.
।। 41 शिवाजी महाराजांनी
पन्हाळगडाहून केलेलं पलायन असो वा आग्र्याहून जनतचं हृदय जिंकून गेलं
कालयवनाला झुलवत, भुलवत,
हुलकावण्या
देत कृष्ण त्याला
नेमकेपणाने राजा मुचकुंद ज्या गुहेत झोपला होता तेथे घेऊन आला.
मुचकुंद
राजा सूर्यवंशीही
नव्हता
आणि सोमवंशीही
नव्हता.
मांधाताचा
हा तेजस्वी,
पराक्रमी
पुत्र अनेक वर्ष इंद्रासोबत
असुरांशी
लढत होता.
असुरांचा
पराभव झाल्यावर
दमलेल्या
मुचकुंद
राजाने
इंद्राकडून
गाढ निद्रेचा
वर मागून घेतला होता.
त्याची
झोपमोड
होऊ नये म्हणून
एका निर्जन
गुहेत तो झोपला होता.
जो कोणी त्याची
झोप मोडेल तो जळून मरेल असा वरही इंद्राने
दिला होता.
आणि त्यानंतर
त्याला
साक्षात
भगवान विष्णूंचं
दर्शन घडेल असा वरही दिला.
एकंदर सर्व गणित कालयवनाच्या
मृत्यूसाठी
छान जुळून येत होतं.
श्रीकृष्णाने गुहेत प्रवेश
करताच मुचकुंदाच्या
अंगावर
आपला मोरपंखी
निळा शेला अलगद पांघरून
घातला.
कृष्णाच्या
मागावर
असलेला
कालयवन
पळपुट्या
कृष्णाला
शोधत थेट त्या गुहेत शिरला.
कृष्णाचा
शोध घेत असता त्याला
कृष्णाचा
निळा शेला दिसला.
कृष्ण समजून झोपलेल्या
मुचकुंदाला
कालयवनाने
लाथ मारली.
झोपमोड
झालेल्या
मुचकुंदाने
क्रोधाने
कालयवनाकडे
पाहताच
कालयवन
जळून खाक झाला.
कदाचित
मुचकुंद
राजाचं
आणि कालयवनाचं
घनघोर युद्धही
झालं असेलं.
पुरेशी
छान झोप झालेला
राजा मुचकुंद
कालयवनाला
नक्कीच
भारी ठरला असेल.
क्रूर परकीय सत्तांनी
केलेल्या
आक्रमणाला
कसं तोंड द्यावं
ह्याचा
धडाच श्रीकृष्णाने
घालून दिला आहे.
तो धडा जर पाळला असता तर पृथ्वीराजाची
आणि त्याच्या
पराभवामुळे
भारताची
जी शोकांतिका
झाली ती झाली नसती.
परकीय़ सत्तांना स्वतःच
एकट्याने
तोंड देऊ नये.
त्यात तुमचाच
अंत संभवतो.
अशावेळेस
बलाढ्य
पण सुप्तावस्थेत
असलेल्या
शक्ती हेरून त्यांची
मदत घेऊन,
त्यांच्याकरवी
परकीयांचा
नायनाट
करावा.
कित्येक
वेळा सध्या प्रसिद्धीच्या
झोताबाहेर
असलेले
परंतु एकेकाळी
प्रचंड
कर्तृत्त्ववान
असलेले,
अनुभवाने
समृद्ध
असलेले
विद्वान
परत एकदा सद्य परिस्थितीत
मदत करू शकतात.
शत्रूचा
पुरता बिमोड करून त्यांना
यमसदनी
पाठविणे
हेच उचित.
आपल्याला
मदत होईल अशा सुप्त शक्तींचा
संकटाआधीच
शोध घेतलेला
असला पाहिजे.
त्यावर
योग्य चिंतन मनन आणि कुठली ताकद कुठे उपयोगी
पडेल हे जाणण्याची
बुद्धीची
कुवत ही हवीच!
त्यासाठी
राजाला
सर्व भूभाग आणि त्याचा
इतिहास
आणि जनतेतील
अनेक प्रकारची
माणसे अत्यंत
बारकाईने
माहित असणे फार जरुरीचे
आहे.
इतिहासात
घडलेल्या
आणि त्याच्या
प्रभावाने
आत्ता घडणार्या
गोष्टींची
योग्य कारणमिमांसा
त्याच्या
मनात पक्की असली पाहिजे.
कृष्णाचा गुप्त वार्ताविभाग
अत्यंत
शिस्तीचा
आणि खडान खडा बातमी देणारा
असलाच पाहिजे.
सिंहाच्या
नाकातला
केस काढून आणायचं
कसब,
झोपलेल्या
नागाच्या
डोक्यावरील
मणी त्याच्या
न कळत हस्तगत
करायचं
कौशल्य
त्यांच्यापाशी
असल्याशिवाय
कालयवनाच्या
जन्माच्या
इतिहासापासून
त्याला
मिळालेल्या
वरापर्यंत
माहिती
त्यांना
गोळा करता आली नसती.
(data collection) सर्व प्रकारची
माहिती
/ वृत्तांत गोळा करायचे काम ते इमाने इतबारे करीत होतेच. त्यातच मांधाता ह्या महापराक्रमी राजाचा पुत्र मुचकुंदाची, सध्या तो कुठे झोपला आहे ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अद्ययावत माहिती कृष्णापर्यंत पोचत होती.
आलेल्या सर्व गुप्त वार्तांचे
विश्लेशण
करून सर्वांचा
इतिहास
अभ्यासून
त्यांचा
उपयोग कसा करू घ्यायचा
हे कसब मात्र कृष्णाचच!
त्याला
तोडच नाही. कृष्णाला सर्वांचा पूर्व इतिहास
खडान् खडा माहित आहे.
म्हणूनच ज्या दोन गोष्टींचा
वरवर काहीही
संबंध नाही अशांची
सांगड घालून एका गोष्टीचा
उपयोग दुसरीकडे
कसा करून घ्यावा
ह्याचे
कृष्ण म्हणजे
एक आश्चर्यकारक
उदाहरण
आहे.
समस्या कितीही मोठी असो श्रीकृष्णाने
आलेल्या
विक्राळ
संकटालाही
त्याच्या
मेधावी
कौशल्याने
शंकराच्या
जटेत बद्ध झालेल्या
गंगेसारखं
थेंबा ठिपक्याइतक
छोटं आणि वैयक्तिक
समस्येसारखं
सीमित बनवून टाकलं.
कृष्ण कायम समस्येची
शिंग हातात धरूनच उभा आहे.
कृष्ण एकही लढाई हरलेला
नाही.
कृष्ण जे ठरवेल तेच घडेल हे पितामह
भीष्मही
जाणून होते.
म्हणूनच
वारंवार
ते दुर्योधन
आणि धृतराष्ट्राला
सबुरीचा
सल्ला देत होते. `युध्ये चाप्यपलायनम् ।' युद्धातून
माघार नाही हे त्याचं
ब्रीद वाक्य आहे.
तात्पुरती
माघार घ्यायला
लागली तर ती यशस्वी
वाटचालीसाठी
आहे.
म्हणून
रणांगणावरच्या
फसव्या
पलायनासाठी
कृष्णाला
मिळालेल्या
रणछोडदास
पदवीत कौतुकाचाच
भाग जास्त आहे.
कृष्णनीती अत्यंत विलोभनीय
आहे.
अत्यंत
सरळ आहे.
सरळ माणसाला
सहज समजणारी
आहे.
पटणारी आहे. लबाड, लुच्चांना
मात्र हाय हाय करायला लावणारी आहे.
एक सोपं सहज तत्त्वज्ञान
रूढ करणारी
आहे.
धर्माने,
नीतीमत्तेनी
वागणार्या
सज्जनाला
बळ देणारी
आहे.
नीतीने
वागणारा
माणूस सन्नीतीच्या
पथाच्या
चाकोरीबाहेर
जायला सहसा धजावत नाही.
अशा वेळेस स्वतः अनीतीचा
मार्ग सर्रास
अनुसरण
करणारी
लुच्ची
स्वार्थी
माणसे मी कसाही वागेन
. हे
नियम जणु काही माझ्यासाठी
नाहीतच,
पण ते तुम्ही
निर्माण
केलेले
असल्याने
तुम्ही
मात्र (जोपर्यंत ते मला सोयीस्कर
आहेत तोपर्यंत) काटेकोरपणे
त्यानुसारच
वागले पाहिजे
असे दडपण सदाचारी
माणसावर
आणतात.
सदाचारी
माणसाला
सदोदित
नियमावर
बोट ठेऊन वागायला
भाग पाडतात.
अशा वेळेस `ठकासी व्हावे ठक खटासी व्हावे खट, लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद' हेच तत्त्वज्ञान उपयोगी पडते. कावेबाज, धूर्त, लांड्या लबाड्या करून फसविणार्यांना धूर्तपणे जाळ्यात फसवायलाच लागते. `नियम मोडला नियम मोडला' असा ठगांनी कितीही कांगावा केला तरी घाबरण्याचे काही कारण नसते.
भारतातल्या कृषी कायद्याला
जेव्हा
दुसर्या
देशाकडून
विरोध व्हायला
लागतो तेव्हा
आपल्या
कृषी कायद्यात
गडबड नसते तर दुसर्या
देशांच्या
शेपटावर
पाय पडलेला
असतो.
भारतात
डाळींचे
उत्पादन
भारताला
स्वावलंबी
करत असून आता आपले कसे होणार ही चिंता दुसर्या
देशाला
लागलेली
असते.
इतके दिवस भारतातल्या
काही ठगांना
हाताशी
धरून येथील नागरीकांना
आवश्यक
असलेले
धान्य येथे पिकवू न देऊन भारतीयांना
दुसर्या
देशातील
मालावर
अवलंबून
ठेवायची
कूट नीती फसल्याने
होणारा
तो विदेशी
तळतळाट
असतो.
मिळणार्या
मिलीभगत
मधे हिस्सेकर्यांच्या
पोटावर
पाय येण्याने
त्याचा
होणारा
जळफळाट
असतो.
हे उद्दाम अनेकवेळा उच्चशिक्षित,
समाजाच्या
वजनदार,
आदरणीय
स्तरातील
असले तरी त्याचे
दडपण न येऊ देता त्यांच्यावर
कारवाई
आवश्यक
असते,
न्यायसंस्थांनीही हे लक्षात
घ्यायला
पाहिजे
की, न्याय आणि हक्क हे नियमांचे
पालन करणार्यांच्या
संरक्षणासाठी
असतात.
नियमाने
वागणारयांसाठी
असतात.
नियमाने
वागणार्या
जबाबदार
नागरीकांच्या
हक्कांची
पायमल्ली
करणार्यां
उद्दामांसाठी
नसतात.
सर्व नियम पाळणार्या
जनतेवर
अन्याय
करणार्यांसाठी,
शोषण करणार्यांसाठी
न्याय आणि हक्क हे कदापि नसतात.
विश्वासघाती, कपटी, कुटिल कारस्थानी,
अनीतीच्या
मार्गाने
जाणार्या
कृतघ्नांना
त्यांच्याच
पद्धतीने,
योग्य रीतीने
हाताळणारा,
त्यांना
वठणीवर
आणणारा,
वा त्यांचा
समूळ नायनाट
करणारा
कपटी नसतो.
त्याला
नियमांचा
मूळ उद्देश्य,
नियमाचा
आत्मा नेमकेपणाने
कळलेला
असतो.
तो नियमांच्या
बाह्य स्वरूपात
अडकत नाही.
तो अत्यंत
विवेकी
मेधावी,
चाणाक्ष,
असतो.
वेळीच दखल घेऊन दुष्टांचे
निर्दालन
करणारा
खरा शासक असतो.
आपल्या
भोवती शत्रूंच्या
सतत कारवाया
चालू आहेत हे लक्षात
घेऊन जो सर्वप्रहरणायुध
असा सतत सज्ज असतो तोच वीर अजिंक्य
असतो.
जरासंध हा कसेही झाले तरी भरतखंडातील
राजा होता.
त्याला
थोडी सवलत देणे कृष्णाने
गैर मानले नाही.
पण कालयवन
हा परकीय,
म्लेंच्छ भारतात घुसून चालणार
नव्हते.
त्याला
बाहेरची
नाहीतर
वरची वाट दाखवणेच
आवश्यक
होते.
नाहीतर
महम्मद
घोरी आणि पृथ्वीराजाची
अलिकडची
हकिगत बरच काही सांगणारी
आहे.
सतरा वेळा पृथ्वीराजाकडून हार पत्करल्यानंतरही
अठराव्या
वेळेला
भारतात
घुसलेल्या
घोरीने
पृथ्वीराजाची
आणि भारताची
काय दयनीय अवस्था
बनवली ती आजही विसरता
येणार नाही.
कृष्णाने
प्रगल्भ
नीतीनिपुणता
न दाखवता
कालयवनाला
मोकाट रान दिले असते तर कदाचित
अठराव्या
वेळेला
मथुरेवरचा
हल्ला यशस्वी
होऊन तेंव्हाच
भारतवर्षाचा
इतिहास
हा यवनांचा
इतिहास
झाला असता.
म्हणूनच कालयवनाला फसवून मुचकुंदाकरवी
जाळून टाकणे असो वा योग्य वेळ येताच भीमाकरवी
बलाढ्य
जरासंधाला
युक्तीने
ठार मारणे असो,
अद्वातद्वा
अपमानकारक
बोलून कृष्णासहित
भीष्मांचाही
अपमान करणार्या
शिशुपालाचे
शिरकाण
असो,
वा अर्जुनाकरवी
`हा
सूर्य आणि हा जयद्रथ'
म्हणून
जयद्रथाचे
मुंडके
उडवून ते त्याच्याच
पित्याच्या
मांडीवर
पडण्याची
काळजी घेणे असो ह्या कृती अन्याय्य
ठरतच नाहीत.
उलट सज्जनांना
न्याय देणा
र्याच
आहेत.
एखाद्या वस्तूचे वजन ज्या प्रमाणे
गुरुत्व
मध्याच्या
ठिकाणी
एकवटलेले
असतं त्याप्रमाणे
विवेक ह्या तीन अक्षरांमधे
बुद्धीचा
सर्व कस, नीतीमत्तेचा
निकष आणि कृतीचा
ठामपणा/कणखरपणा
एकवटलेला
असतो.
वस्तूचा
तोल सांभाळला
जाण्यासाठी
वस्तूच्या
गुरुत्वमध्यातून
जाणारी
लंब रेषा त्याच्या
पायातून
जावी लागते त्याप्रमाणे
माणसाचा
कुठलाही
निर्णय
हा विवेकाला
पार करून निर्णयाप्रत
येतो तेंव्हाच
तो माणूस मानसिक
दृष्ट्या
समतोल आहे असं म्हणता
येईल.
-------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment