मथुरा ते स्वर्ण द्वारावती
मथुरा
ते स्वर्ण
द्वारावती
विवेक,
ठाम निर्णय प्रक्रिया, उत्तम
नियोजन,
कालयवन मेला. अस्त्रा शस्त्राने मरणार नाही,
सूर्य वा सोमवंशीय
वीरांच्या
हातून मरणार नाही असा शंकराचा
वर प्राप्त
झालेला
कालयवनही
मोठ्या
रहस्यमयरीत्या
जळून मेला.
अस्त्र
शस्त्र
नकोत तर मुचकुंदाच्या
नुसत्या
दृष्टिक्षेपाने
जळाला.
सोमवंशीयही
नाही सूर्यवंशीयही
नाही अशा मुचकुंदाकडून
मेला.
यवनांना/म्लेंच्छांना
सर्व अघटितच
वाटत होते.
कृष्णाकडून
झालेल्या
पराभवाने
त्यांचा
संताप संताप होत होता.
म्लेंच्छ
म्हणजेच
यवन कुठलेही
नियम पाळणारे
नव्हतेच.
नियमाविरुद्ध
वागणे हा एकमेव नियम त्यांनी
पाळला होता. त्यामुळे स्वभावानेही ते शांत नव्हते.
कालयवनाचे
उग्र,
भांडकुदळ,
हिंसक आणि आक्रमक
बिथरलरलेले
अनुयायी
थयथयाट
करू लागले.
मथुरेवर
आक्रमणे
करू लागले.
जरासंधाचा
त्यांना
पाठिंबा
होताच.
उग्रसेनाला
कृष्णाने
सिंहासनावर
बसवावे
हे जरासंधाला
अमान्य
होते.
कालयवनाशी कृष्णाने केलेला
तह कालयवनाच्या
प्राणावर
बेतल्यामुळे
जरासंध
कृष्णाशी
तह करायला
तयार झाला नसता.
उलट कृष्णाचा
हा अजून काही डाव आहे असं समजून सावधपणे
त्याने
तो नाकारलाच
असता.
ज्याप्रमाणे
तापलेल्या
तेलावर
पाण्याचा
शिडकावा
दिला तर तेल जास्तच
तडतडायला
लागतं त्याप्रमाणे
क्रुद्ध
झालेल्या
जरासंधासमोर
ठेवलेल्या
शांतीप्रस्तावाने
जरासंध
जास्तच
संतापला
असता.
यवन आणि जरासंध
ह्यांच्या
युतीने भारतवर्षाचे फार नुकसान
केले.
स्वतःच्या
शत्रूचा
निःपात
करण्यासाठी
परकीयांना
बोलावण्याचा नतद्रष्टपणा हा पूर्वापार
भारतात
चालत आला आहे हे आपले दुर्दैव!
भारताला
तीन बाजूंनी
समुद्राने
वेढले असले,
उत्तरेकडे
कणखर हिमालय
भारताच्या
रक्षणास
उभा असला तरी भारताची
वायव्य
सरहद्द
कायमच परकीयांच्या
आक्रमणांचा
इतिहास
सांगणारी
आहे.
अत्यंत क्रूर, लोभी,
धर्महीन
अशा शत्रूसोबत
तह करणे योग्य नव्हते.
अशा शत्रूशी
मैत्रीही होऊ शकत नव्हती. वारंवार युद्धाने शूरसेन
जनपद क्षीण,
कमकुवत
होण्याचे
भय होते.
सतत युद्धांना
तोंड देणार्या
देशात शांती कशी नांदावी?
देशाचा
विकास कसा व्हावा?
ह्यासाठीच कृष्णाने मथुरेचे राज्य सर्व प्रजेसह
हलवून दुसर्या
ठिकाणी
नेण्याचा
मनसुबा
रचला.
ही यान नावाची
युद्धनीती.
यान म्हणजे
पलायन.
लढतांना
पराभव होत आहे हे पाहून जीव वाचविण्यासाठी
शत्रूला
पाठ दाखवून
पलायन हा एक प्रकार तर दुसरा प्रकार
म्हणजे,
सतत होणार्या
आक्रमणांमुळे
होणारे
अपरिमित
नुकसान
टाळण्यासाठी
दुसरी सोयीस्कर
जागा शोधून तेथे स्वसंरक्षणाची
उत्तम व्यवस्था
करून तेथे स्थलांतरीत
होणे.
नवीन भक्कम बंदोबस्ताच्या
जागेचा
आश्रय धरून राहून शत्रूसैन्यावर जरब ठेवणे ह्या क्रियेला
संश्रय
म्हणतात.
काहींच्या
म्हणण्याप्रमाणे
कृष्णाने
संपूर्ण
मथुरेच्या
राज्याचं
स्थलांतर
कालयवनाच्या
चढाईच्या
आधी केलेलं
आहे.
तसं असलं तरी ते नक्कीच
जास्त प्रशंसनीय ठरेल.
मुथुरेच्या नागरीकांनी मथुरा सोडून स्थलांतर करायला मान्यता देताच कृष्णाने
विश्वकर्माला पाचारण केलं. शहरांची निर्मिती करण्यासाठी त्याचा उत्तम आराखडा बनविणे, नकाशे काढणे, योजना करून ती
अमलात आणणे हे फार जरुरीचे होते. विश्वकर्मा नगर-
व्यवस्थापन जाणणारा उत्तम अभियंता होता.
कृष्णाने समुद्र किनारी, गोमती नदीच्या तीरावर रैवतक पर्वताशेजारची
कुशस्थली नावाची रम्य जागा निवडली. ही जागा शोधतांना कृष्णाने अनेक गोष्टींचा
सखोल विचार केलेला दिसतो. मानवी संस्कृती भरभराटीस येण्यासाठी एखादा चांगला जलस्त्रोत , नदी आवश्यक असते. त्याप्रमाणेच
नदीच्या पुरामुळे येणार्या संकटाला तोंड देण्यासाठी जवळ एखाद्या पर्वताचीही
आवश्यकता असते हे गोवर्धनाच्या आपत्तीने आलेलं शहाणपण कृष्ण विसरला नाही. मथुरेत असलेली एक कमी द्वारका पूर्ण करणार
होती ती म्हणजे समुद्र. मथुरेच्या चारही बाजू जमिनीनेच वेढल्या
होत्या द्वारका येथे उत्तम बंदर निर्मिती
करून कृष्णाने व्यापार-उदीमाच्या दिशा आणि क्षेत्र विस्तृत केले. येथून संपूर्ण
भारताच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणे आणि भारतात घुसणार्या परकीयांवर धाक ठेवणे
सहज शक्य होते. राजधानी ही देशाच्या मध्यभागात असावी ह्या संकल्पनेला छेद
देणारी ही कृती आहे. चारी बाजूने जमिनीने वेढलेली राजधानी स्वतःच्याच समस्यांमधे
गुंतत, झुंजत आणि फसत जाते. समुद्रकिनारी असलेली राजधानी परकीय आणि आतील
दोन्ही शत्रूंवर नजर आणि वचक ठेवतेच शिवाय व्यापारी भरभराट होण्याच्या दृष्टीनेही
सुयोग्य असते.
विश्वकर्म्याने समुद्रातून पृथ्वीच्या
एका तुकड्याला बाहेर काढून त्यावर द्वारिका वसविल्याचे उल्लेख आहेत. कदाचित पाण्यात
भराव घालून ह्या नगराची निर्मिती झाली असावी. अथवा पाण्याखाली दबलेल्या जमिनीखाली काही ताकद
लावून ती जमिन वर उचलून घेऊन तिला पाण्यात खालून आधार दिला असावा. द्वारिका ही
नुसती एक नगरी नसून विस्तृत राज्य असल्याच्या खुणा आजही सापडतात. समुद्राखाली
केलेल्या अभ्यासात द्वारका ते थेट सुरतपर्यंत एक सलग तटबंदी असल्याच्या समुद्राच्या तळाशी खुणा सापडतात.
वेगवेगळ्या बाजारपेठा, नागरी निवासाची
वेगळी क्षेत्रे, अनेक सार्वजनिक उपयोगी गोष्टी व जागा, सर्वत्र प्रशस्त
रस्ते, सोने, चांदी आणि रत्नांनी सुशोभित केलेले एकसे एक
सुंदर भव्य महाल, मन प्रसन्न करणारी उद्याने,
तलाव, ह्यामुळे ही नगरी मोठी लक्षवेधी झाली होती.
जवळ जवळ सात लाख महाल आणि भवनांची निर्मिती
येथे केली होती.
मथुरेची परंपरा पुढे चालवत
द्वारकावतीमधेही लोकतंत्राचीच परंपरा पुढे चालू ठेवण्यात आली. `सुधार्मिक
सभा' नावाचा एक अति विशाल सभामंडप सार्वजनिक सभांसाठी बांधला होता. सर्व नागरीकांची सभा घेण्यासाठी आणि इतर सार्वजनिक
उत्सवांसाठी तो वापरला जाई. द्वारका आणि बेट द्वारका असे द्वारकेचे दोन
भाग होते. द्वारिका हे उत्तम बंदर असल्याने तेथून बाहेरच्या देशांशी
सतत व्यापार चालू राही. त्यामुळे समृद्धीच्या मार्गावरील जणु हे
सोन्याचं द्वारच असावं ज्यामुळे ह्या नगरीला स्वर्णद्वारिका म्हणत असत. द्वारकेला चार
बाजूंना चार दरवाजे होते. समुद्रमार्गाने भारतात प्रवेश करण्याचं द्वार
म्हणून ती द्वारका.
शांतपणे पण दृढनिश्चयाने
एखादा निर्णय
घेऊन पार पाडायचे
कौशल्य
कृष्णाचेच.
कृष्णाचा
परम विवेकीपणा
योग्य निर्णयक्षमता
व नियोजन
ह्यातून
दिसून येते.
आत्ता आत्ता महम्मद
बीन तुघलकाने
(1324 ते
1351) त्याची राजधानी
दिल्लीहून
दौलताबादला
हलवायचे
केलेले
नाटक त्याच्या
किती अंगलट आले हे सर्वांना
माहितच
आहे.
नागरिकांना
झालेला
प्रचंड
त्रास,
रस्त्यातच
मेलेले
अगणित लोक आणि सर्व बेत फसल्याने
त्याला
मिळालेली
`वेडा महम्मद' ही पदवी बरच काही सांगून
जाते.
खरेतर इतिहासातील
तो एकमेव उच्चशिक्षित
सुलतान
होता.
कृष्णाने नुसती राजधानीच
नाही तर नागरिकांसहित
पूर्ण राज्य कुठलाही
गोंधळ
,गडबड
न होऊ देता द्वारकेला
हलवले. मथुरावासियांना कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारे
तो एका रात्रीत
द्वारकेस
घेऊन आला.
म्हातारे,
कोतारे,
विकलांग,
लहान बालके,
शिशु सर्वांची
उत्तम काळजी घेऊन कोणालाही
त्रास न होता घेऊन आला.
आजच्या सर्व सोयींनी
युक्त सुधारित
जगातही
मथुरा ते दिल्ली
132 कि.मी बसने जायला
3 तास
10 मिनिटे + दिल्ली ते जामनगर 990 कि.मी विमान प्रवास 4 तास 10 मिनिटे + जामनगर ते द्वारका 114 कि. मि. 2 तास 50 मिनिटे लागतात. आज हे किमान 1236 किमी. चं अंतर पार करायला किमान दहा तासांच्यावर वेळ लागतो. त्यातील बसस्टेशन ते एअरपोर्ट असा मधला वेळ जो खरेतर अजून 4-5 तास तरी होईल तो धरलेला नाही. शिवाय त्यातील मोठा पल्ला हा विमान प्रवासाचा
आहे हे लक्षात
घेतल्यावर
त्याकाळची
ही केवढी मोठी घटना आहे हे लक्षात
येईल.
सारे मथुरावासी एकाचवेळेस
येथे आल्यावर
कुठचाही
गोंधळ न होता घरांचे
वाटप कसे झाले असेल?
त्यांच्या
जेवण राहण्याची
सोय कोणी केली असेल?
घरे लावतांना
नागरिकांना
येणार्या
अनेक समस्यांची
पूर्ती
कशी केली असेल असे अनेक प्रश्न
अनुत्तरीत
असले तरी सर्व समस्यांचा
सखोल विचार केला गेला होता एवढं नक्की.
कारण कुठेही
कोणाला
त्रास झाल्याची
इवलीही
तक्रार
नोंदवली
गेलेली
नाही.
--------------------------------------------------------------
एका नव्या लोकतंत्राला
सुरवात
झाली.
एका समृद्ध
सुशासनाला
सुरवात
झाली.
आक्रमणविरहित,
स्वस्थ,
शांत जीवनाचा
लाभ लोकांना
झाला.
राज्याला
स्थिरता
लाभल्याने
अनेक ऋषी,
मुनी द्वारकेत
येऊन राहू लागले.
त्यांच्या
विद्वत्तेचा
उपयोग राज्यकारभारात
होऊ लागला.
समाजात असलेला त्यांचा दबदबा,
लोकांच्या दुष्कर्मावर असलेली त्यांची करडी नजर, वाईट वागण्याबद्दल कधी गोडीने तर कधी
खडसावून जाब विचारण्याने (आज ज्याला सोशल पोलिसिंग ठरवून ज्याची हेटाळणी होते) नकळत लोकांना सत्शील व सदाचारी राहण्यासाठी मदत करू लागला. कृष्णाच्या सदाचरणाचा, अत्यंत नियमाने वागण्याचा आदर्श सतत लोकांसमोर असल्याने
नियमांचं जोखड न वाटता नियमबद्ध आयुष्य द्वारकापुरीच्या लोकांनी सहज आत्मसात केलं आणि दैनंदिन व्यवहाराचं अविभाज्य अंगच झालं.
-----------------------------------------------------------------
प्रजेसाठी
सर्व व्यवहार सुरळीत चालू असले तरी म्हणतात ना की राज्याभिषेकाच्यावेळी सोन्याच्या घटातून राजाच्या
डोक्यावर जलाभिषेकाच्या जळासोबत संकटेही कोसळत असतात. संकटे कोणालाही सोडत नाहीत. राजा
राम असो, रावण असो, राजा नल असो, राजा बळी असो पांडव असोत अथवा कृष्ण असो. आपत्तिंसाठी
अगम्य असा देश वा माणूस कोणीही नाही. प्रत्येक माणसाला आपल्या नशिबात असलेल्या
संकटांना तोंड द्यावेच लागते. ज्याच्या मनात गुणांबद्दल आदर असतो, चांगल्या सेवकांची ज्याला कदर असते, जो संकटे येण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करतो, व्यसनांपासून दूर राहतो, तोच राज्यलक्ष्मीचा चिरकाळ उपभोग घेऊ शकतो.
कृष्ण
द्वारीकापुरीच्या नवीन लोकतंत्राचा मुख्य नव्हता. तरीही कृष्णाचा वाढता प्रभाव त्याच्या
आप्तांना सलत होताच. वयाने कृष्णाचे वडील अथवा काका शोभावेत अशा
अक्रूर, कृतवर्मा, शतधन्वा, यांचाही त्यात सामावेश होता. ते
फक्त योग्य संधीची वाट बघत होते. आणि तशी आयती संधी चालून आली.
वारणावतला
पाचही पांडव माता कुंतीसहित
जळून मेले. त्यांची पार्थिवेही सापडली. त्यांच्यासोबत
विरोचनही जळाला. पांडवांच्या ह्या दुःखद मृत्यूने `शोकाकूल' (?)
झालेल्या धृतराष्ट्राने आणि दुर्योधनाने साग्रसंगितपणे त्यांचे सर्व अंत्यसंस्कार
करून त्यास सर्व राजांना बोलावले. कृष्ण आणि बलरामासही हस्तिनापूरला जाणे भाग
होते. द्वारिकापुरीत कृष्ण आणि बलरामाची अनुपस्थितीत
ब र्याच घटना घडल्या किंवा
घडवून आणल्या गेल्या.
आणि परत एकदा स्यमंतक मणी चोरल्याचा कृष्णावर आळ
आला. कृष्णावर
स्यमंतक मणी चोरल्याचा दोनदा आळ आला. स्यमंतक मणी होताच तसा. तो प्रत्यक्ष सूर्याने
राजा सत्राजिताला दिला होता. तो
रोज आठ भार सोने देत असे. कृष्णाने एकदा हा मणी सत्राजिताला मागितला
होता. कदाचित गमतीने असेल कदाचित त्याचा योग्य
उपयोग व्हावा ह्या हेतूनेही असेल. पण त्या राईचा पुढे पर्वत झाला किंवा केला
गेला.
----------------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment