Posts

Showing posts from September, 2023

भुंगा –

  भुंगा – भुंगा पोखरु दे सदैव हृदया ; सांगो मला सर्वदा ` पीडा - खंड ’ कसा असे वगळला आयुष्य ग्रंथातला झाले कागद ते गहाळ मधले आयुष्य ग्रंथातले लागो ही मज टोचणी निशिदिनी ते खंड ना वाचले दुःखाचा खडकाळ दुर्गम कडा गेलो चढोनी न मी काट्याच्यासम राहु दे सलतची हे दुःख माझ्या हृदी   माझे लब्धप्रतिष्ठितात उठणे वा बैसणे वागणे हे ऐश्वर्य विलास भोग सगळे ना वैभवासी उणे राहो ते परि पोखरीत हृदया   “ ते खंड ”   प्रत्यक्ष मी  पाहीले नच वाचले अनुभवे काहीच ह्या जीवनी दुःखाचा पथ त्रासदायक महा मी चाललो ना कधी राहो हीच क्षणोक्षणी सल मना काट्यासमा टोचरी     उंची झुंबर , गालिचे सजविती उत्कृष्ट शिल्पे घरा संगितासमवेत नृत्य करिती बाला हसोनी जरा सारेची स्तुतिने मला रिझविती त्या धुंद शब्दातुनी नाकारून सुखा , निमंत्रण दिले ना घोर मार्गा कधी कष्टाचा खडकाळ तो पथ पहा मी चाललो ना कधी आनंदातहि राहु दे सलत ही त्या वेदनेची सुरी   सौख्याचा पथ हा सरून मजला हा ! धाप लागेल की घेई मी बसुनीच धूळ भरल्या रस्त्यात जेंव्हा कधी तेंव्हाही मनभृंग तो कुरतडो ह्या वाळल्या फांदिसी वारंवा

विनायक ते गजानन प्रवास

  विनायक ते गजानन प्रवास गणेशाची उत्पत्ती  आपल्या हिंदू/सनातन धर्मात अनेक सत्य घटना /वस्तुस्थती, निसर्गातील अनेक नियम, सूर्य,चंद्र, तारे ह्यांची माहिती ही अत्यंत आकर्षक अशा गोष्टींसोबत अशी काही सुंदर रीत्या गुंफली जाते की भल्याभल्यांनीही अचंबित व्हावं धृव तारा उत्तर दिशेला एका जागी स्थिर आहे हे ज्ञान सर्वसामान्यांना गोष्टीरूपातून किती सहज पचनी पडतं. तशीच ही गणेशाची कथा.     शिव आणि पार्वती हे ह्या गणेशाचे तात आणि माय . शिव हा सार्‍या विनाशाचं प्रतिक तर पार्वती जगातील सार्‍या नवनिर्मितीचं प्रतिक . वरवर पाहता दोघांच्या कृती एकमेकांच्या विरुद्ध . पण छे ! विनाश आणि नवनिर्मिती दोन्हीही एकाच कृतीची अभिन्न अंगे . एक कृती घडत असतांनाच दुसरी कृती अपोआप होत असते . नदी डोंगरावरून वाहत येतांना डोंगराची झिज होते . धूप होते . त्याचमुळे पुढे सुपीक गाळाची जमिन तयार होते . दोन्ही कृती एकमेकांवर इतक्या अवलंबून आहेत की एक झाली तरच दुसरी होणार . तसेच विनाशरूपी शिव आणि   नवनिर्मितीची मूर्ती उमा एकमेकांत इतके एकरूप झाले आहेत की त्यांना एकमेकांपासून कोणी दूर करू शकत नाहीत .                      

शिल्पी -

  शिल्पी - दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत तसे दोन पराकोटीचे शूर, विद्वान किंवा कलाकार बापलेक एकत्र राहणं दुरापास्तच. एकनाथ त्यांच्या वाड्याच्या अंगणात सर्वांसाठी कीर्तन करत, सर्वांनाच जेऊ घालत. ह्या त्यांच्या   वागण्याला   नाथांच्या मुलाचा तीव्र विरोध होता. बाप ऐकत नाही म्हटल्यावर नाथांचा मुलगा काशीस निघून गेला. मुलाच्या विरहाने आई आजारी पडलेली पाहून शेवटी नाथ काशीला गेले आणि मुलाच्या सर्व अटी मान्य करून त्याला घरी घेऊन आले. नाथांऐवजी मुलगा कीर्तनास उभा राहिला. पण श्रोते म्हणून फिरकेनात.   एकदा एका दरिद्री दलित स्त्रीने नाथांना आणि त्यांच्या मुलाला घरी जेवायला बोलावलं. जर एकनाथ माझ्या घरी जेवले तर मला सहस्रभोजनाचं पुण्य लाभेल असा तिचा विश्वास होता. एकनाथ जेवायला लगेचच तयार झालेले पाहून त्यांचा मुलगा म्हणाला, ``स्वयंपाक मी करीन तरच तुझ्याकडे जेऊ''. बाई तयार झाली. जेवायला बसल्यावर न राहवून बाईने स्वतः तयार केलेला एक लाडू नाथांच्या पत्रावळीवर वाढला. नाथांनीही मोठ्या प्रेमाने तो खाल्ला. नंतर पत्रावळी उचलतेवेळी मुलाच्या लक्षात आलं की नाथांच्या पत्रावळीखाली अजून 999 पत्राव

राजा भोज आणि मुंज

  राजा भोज आणि मुंज राजा सिंधुल आणि राणी सावित्री ह्यांना त्यांच्या उतारवयात झालेला पुत्र म्हणजे राजा भोज . भोजाचा जन्म होताच अनेक प्रसिद्ध ज्योतिषकारांनी   अशी भविष्यवाणी केली की , ` हा मुलगा अत्यंत बुद्धिमान निपजेल आणि पन्नास वर्षाहून अधिक वर्षे अत्यंत योग्य रीतीने राज्य करेल .' अत्यंत वयोवृद्ध झालेल्या राजा सिंधुलाला   आपल्या पश्चात आपल्या एकुलत्या एक पुत्राचे कसे होईल ही चिंता सतावत होती . कारण सिंधुलराजाचा भाऊ मुंज मोठा महत्त्वाकांक्षी होता . सिंधुलानंतर मीच राजा होणार अशी स्वप्ने बघत होता . भोज त्यावेळेस जेमतेम पाच वर्षांचा अबोध बालक होता . शेवटी आपल्या मरणसमयी सिंधुलराजाने पाच वर्षांच्या बालक भोजास मुंजाच्या मांडीवर बसवले आणि त्याच्या नावाने राज्यकारभार करण्यास मुंजाला सांगून आपले प्राण सोडले .      आईबापाविना पोरका भोज मुंजाच्या ताब्यात होता . भोजाचा काटा कसाही करून काढला पाहिजे   असा विचार करत मुंजा योग्य वेळेची वाट बघत होता . शेवटी मुंजाने बंगालहून वत्सराजा