Posts

धियां साक्षी शुद्धः –

  धियां साक्षी शुद्धः –   महाभारतातील भीषण युद्धाचं वर्णन गीते च्या   सुरवातीला असलेल्या गीता-महातम्यातील श्लोकात दिलं आहे. तो श्लोक असा   आहे, भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला । अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी   सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ।। म्हणजेच, जी रोरावत जातसे रणनदी संहारकारी महा भीष्म द्रोणचि काठ दुर्गम तिचे ना लागती जे करा । सूडाने गढुळे जयद्रथरुपी पाणी जिचे सर्वथा जेथे धूर्त लबाड त्या शकुनिच्या जाळ्याच नीलोत्पला ।।   लाटां भीषण उंच ह्या धडकती राधेयरूपी महा लाभे वेग महा भयानक तिला योद्धा कृपाचार्य हा । घेई जी वळसेचि घातक जिला दुर्योधनी भोवरे अश्वत्थाम विकर्ण शल्य मगरी मासे महाकाय ते ।।   गेले पार करोनि ती रणनदी कौंतेय ते सर्वही नावाडी असताच केशव कशी जाणार ना नाव ती । लाभे ज्यासचि कृष्णसंग बरवा चिंता तयासी नसे जाई पार करोनि तो भवनदी चित्ती जया कृष्ण...

एकाम्रवन आणि जगन्नाथ -

  एकाम्रवन आणि जगन्नाथ -   पुरीच्या जगन्नाथासमोर उभे होतो.   महा प्रचंड गर्दी , सतत दूर दूरहून येणारे लोकांचे लोंढे , मंदिरात पाय ठेवायलाही जागा नाही , उड्या मारून मारून घेतलेले जगन्नाथाचे दर्शन , त्यातही गाभार्‍याचा दरवाजा असा काही अर्धवट उघडलेला किंवा   जास्त करून लावलेला की त्यातून बलराम दिसेल पण कृष्ण दिसूच नये . वाकवाकून दिसला दिसला म्हणत चित्तचोराचं झालेलं दर्शन-- (आपल्या मंदिरांमधे दरवाजे अर्धवट उघडे ठेवायच्या, चारी बाजूंना मोठे दरवाजे असूनही एक छोटासा दिंडी दरवाजा एघडा ठेवायचा, देवाचा दरवाजा किंवा पडदा अचानक चालू बंद करायच्या   मंदिरवाल्यांनी शोधलेल्या प्रथा ह्या चेंगराचेंगरी होण्यास जास्त पोषक आणि स्टँपीडमधेच भक्तांना मोक्ष प्रदान करणार्‍या असतात का?) सगळच जरा मनाला नाराजीकडे झुकवणारं होतं. लांबून लांबून शेकडो बसेस भरभरून आलेल्या गरीब सुदाम्यांच्या आणि सुदामदेवींच्या चेहर्‍यावरील श्रद्धा आणि कृष्ण भेटीचा आनंद पाहून मलाच जरा खजील झाल्यासारखं वाटत होतं. खूप दिवस पुरीच्या जगन्नाथाला जायच जायचं म्हणूनही जाणं राहून जात ह...